google-site-verification=3ccttg2CvVnm5lZNF7i_OB6Mi5rxen7lfRepv_2dEyM google-site-verification: google0702dd00099c52c4.html Rushikeah Adalinge : इ 10वी ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय

About Me

माझे नाव ऋषिकेश विषणु आदलिंगे
Showing posts with label इ 10वी ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय. Show all posts
Showing posts with label इ 10वी ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय. Show all posts

Sunday, May 23, 2021

1)संविधानाची वाटचाल प्रश्न उत्तरे

 1)संविधानाची वाटचाल प्रश्न उत्तरे


१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण

करा.



(१) महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थांमध्ये महिलांसाठी 

........... जागा राखीव ठेवण्यात आलेल्या

आहेत.

(अ) २५% (ब) ३०%

(क) ४०% (ड) ५०%

Ans-ड) ५०%

(२) पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे 

स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास 

अनुकूल वातावरण निर्माण केले आहे?

(अ) माहितीचा अधिकार कायदा

(ब) हुंडाप्रतिबंधक कायदा

(क) अन्नसुरक्षा कायदा

(ड) यांपैकी कोणतेही नाही.

Ans-ब) हुंडाप्रतिबंधक कायदा

(३) लोकशाहीचा गाभा म्हणजे ........

(अ) प्रौढ मताधिकार

(ब) सत्तेचे विकेंद्रीकरण

(क) राखीव जागांचे धोरण

(ड) न्यायालयीन निर्णय

Ans-ब) सत्तेचे विकेंद्रीकरण


२. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

(१) भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही 

मानली जाते.

Ans-बरोबर 

कारण:- 1)भारतीय स्त्री-पुरुषाला २१ वर्षे वयाची

अट निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधानाने 

दिला होता. तो आणखी व्यापक करत मतदाराचे वय

२१ वरून १८ वर्षे इथपर्यंत आणले. स्वतंत्र भारतातील

नव्या युवा वर्गाला र्गा यामुळे अर्थातच र्था राजकीय अवकाश 

प्राप्त झाले. 

2)अशा लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या

बदलामुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी

लोकशाही मानली जाते.


(२) माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील 

गोपनीयता वाढली आहे ?

Ans-चूक

1)लोकशाहीत नागरिकांचे सक्षमीकरण अनेक मार्गांनी झाले पाहिजे. नागरिकांना सहभागाच्या संधी देत असतानाच त्यांच्याशी असणारा शासनाचा संवाद वाढला पाहिजे. शासन व नागरिक यांच्यात जितके अंतर कमी आणिसंवाद जास्त, त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया सकस, सुदृढ होत जाते. त्यांच्यातील परस्पर विश्वासवाढण्यासाठीही शासन काय करते हे नागरिकांना समजले पाहिजे.

2)पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही 

सुशासनाची दोन वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी

भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात 

आला. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या

कारभारातील गोपनीयता कमी झाली व शासनाचे 

व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली.


(३) संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे 

असते.

Ans-बरोबर

 1)संविधान प्रवाही असते. एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे (living document) त्याचे स्वरूप असते. परिस्थितीनुसार संविधानात बदल करावे लागतात आणि तो अधिकार अर्थातच संसदेला आहे. संसदेचा हा अधिकार मान्य करत न्यायालयाने संसदेला या तिच्या अधिकारावरील मर्यादांची जाणीव करून दिली. 2)संविधानात बदल करताना संविधानाच्यामूलभूत चौकटीला (Basic structure of the Constitution) संसदेला धक्का लावता येणार नाही अशी न्यायालयाने भूमिका घेतली.



3)टीपा लिहा 

1) अल्पसंख्याकविषयक तरतुदी

Ans-1)भारतीयसंविधानाने अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत. 

2)भारतीयसंविधानाने जात, धर्म, वंश, भाषा व प्रदेश इत्यादी घटकांवर आधारित भेदभाव करण्यास प्रतिबंध केला आहे. 

3)अल्पसंख्याकांविषयीची ही व्यापक तरतूद 

असून समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, 

शोषणाविरुद्धचा हक्क आणि सांस्कृतिक व शैक्षणिक 

हक्कांमुळे अल्पसंख्याकांना मूलभूत स्वरूपाचे संरक्षण 

मिळाले आहे.


2) राखीव जागाविषयक धोरण

Ans- : जे लोकसमूह अथवा समाजघटक शिक्षण आणि राेजगारांच्या संधीपासून दीर्घकाळ वंचित राहिले अशा समाजघटकांसाठी राखीव जागांचे धोरण स्वीकारण्यात आले.

2) त्यानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये काही जागा राखीव ठेवल्याजातात. त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीयांसाठीही राखीव जागांची तरतूद आहे.


3) लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व

Ans-1)आपल्या देशात राजकारण आणि राजकीय

संस्था यांच्यातील स्त्रियांचे प्रतिनिधित्व हे सुरुवातीपासूनच कमी आहे.

2)जगभरातल्या अनेक देशांनी महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्नकेला. भारतातही या दृष्टीने बदल होत आहेत. 7३ व्या व ७४ व्या घटनादुरुस्तीने स्थानिक शासनसंस्थांमध्ये ३३% जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या. 

3)त्यानंतर हे प्रमाण महाराष्ट्रासह अनेक 

राज्यांमध्ये ५०% पर्यंत वाढवण्यात आले आहे. 

महिलांसाठी राष्ट्रीय महिला आयोग स्थापन करण्यात 

आला. राज्यामध्येही राज्य महिला आयोग आहे.

4)घरगुती हिंसाचारापासून महिलांना संरक्षण देणारा 

कायदा हे लोकशाहीकरणाला पोषक असलेले 

महत्त्वाचे पाऊल आहे. स्त्रीची प्रतिष्ठा व आत्मसन्मा न

राखण्याची आवश्यकता या कायद्याने अधोरेखित 

केली. पारंपरिक वर्चस्व आणि अधिकारशाहीला 

नाकारणाऱ्या या निर्णयाने भारतीय लोकशाहीचा 

आवाका वाढवला, त्यातील समावेशन (inclusion) 

अधिक अर्थपूर्ण केले.


4. संकल्पना स्पष्ट करा

1) हक्काधारित दृष्टीकोन

Ans-   स्वतंत्र भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला, ही शासन पद्धती देशात रुजावी, प्रगल्भ व्हावी यासाठी प्रत्येक शासनाने प्रयत्न केले,


          सुधारणा करताना नागरिकांकडे केवळ लाभार्थी म्हणून पाहण्याचा सुरुवातीला सत्तेवर आलेल्या सरकारांचा दृष्टिकोन होता, मात्र इसवी सन 2000 नंतरच्या काळात नागरिकांचा हक्क ही भूमिका घेऊन सुधारणा होऊ लागल्या.
    प्रत्येक नागरिकाला माहितीचा, शिक्षणाचा तसेच अन्नसुरक्षेचा केवळ लाभ व्हावा म्हणून कायदे केले गेले नाहीत, तर ते नागरिकांचे हक्क मानले गेले. या भूमिकेलाच हक्काधारित दृष्टीकोन असे म्हणतात.





2)माहितीचा अधिकार 
Ans-1)लोकशाहीत 
नागरिकांचे सक्षमीकरण अनेक मार्गांनी झाले पाहिजे. 
नागरिकांना सहभागाच्या संधी देत असतानाच 
त्यांच्याशी असणारा शासनाचा संवाद वाढला पाहिजे. 
शासन व नागरिक यांच्यात जितके अंतर कमी आणि
संवाद जास्त, त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया सकस, 
सुदृढ होत जाते.
2) त्यांच्यातील परस्पर विश्वास
वाढण्यासाठीही शासन काय करते हे नागरिकांना समजले पाहिजे. 
3)पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही 
सुशासनाची दोन वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी
भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात 
आला. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या
कारभारातील गोपनीयता कमी झाली व शासनाचे 
व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली.
4)इ.स.२००० नंतरच्या काळात नागरिकांसाठी 
सुधारणा करताना तो त्यांचा हक्क मानून सुधारणा 
करण्याकडे कल वाढला. त्यानुसार माहितीचा, 
शिक्षणाचा व अन्नसुरक्षेचा हक्क भारतीयांना मिळाला 
आहे. या हक्कांमुळे भारतातील लोकशाही निश्चितपणे 
बळकट झाली आहे


पुढील प्रश्नांची थोडक्‍यात उत्तरे लिहा.
(१) मतदाराचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षेकेल्यामुळे 
कोणते परिणाम झाले?
Ans-1)भारताच्या संविधानाने प्रौढ
मताधिकाराची तरतूद केलेली होतीच. त्यानुसार 
मताधिकाराची व्याप्ती मुळातच व्यापक होती. 
मताधिकाराचा संकोच करणाऱ्या स्वातंत्र्यपूर्वकाळात 
प्रचलित असलेल्या सर्व तरतुदी नष्ट करून स्वतंत्र
भारतात प्रत्क ये भारतीय स्त्री-पुरुषाला २१ वर्षे वयाची
अट निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधानाने 
दिला होता. तो आणखी व्यापक करत मतदाराचे वय
२१ वरून १८ वर्षे इथपर्यंत आणले. स्वतंत्र भारतातील
नव्या युवा वर्गाला र्गा यामुळे अर्थातच र्था राजकीय अवकाश 
प्राप्त झाले. 
2)अशा लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या
बदलामुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी
लोकशाही मानली जाते. इतकी मतदारसंख्या अन्य
कोणत्याच लोकशाही असलेल्या देशात आढळत 
नाही. हा बदल केवळ संख्यात्मक नसून तो गुणात्मकही 
आहे. अनेक राजकीय पक्ष या युवा मतदारांच्या
पाठिंब्यामुळे सत्तेच््ते या स्पर्धेत ्पर्धे उतरले. भारतातील
राजकीय स्पर्धेचे स्वरूपही त्यामुळे बदलले आहे.


2) सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय ?
Ans-1)सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे ज्या
ज्या सामाजिक बाबींमुळे व्यक्तींवर अन्याय होतो तो 
दूर करणे व व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान 
असतो याचा आग्रह धरणे. जात, धर्म, भाषा, लिंग, 
जन्मस्थान, वंश, संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ 
व कनिष्ठ असा भेद न करणे व सर्वांना विकासाची 
समान संधी उपलब्ध करून देणे हे न्याय व समतेचे 
उद्दिष्ट आहे.
2)सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी 
समाजात सर्व स्तरांवर प्रयत्न करावे लागतात, परंतु 
शासनाच्या धोरणांना व अन्य प्रयत्नांना विशेष महत्त्व
असते. लोकशाही अधिकाधिक सर्वसमावेशक 
होण्यासाठी सर्व सामाजिक घटक मुख्य प्रवाहात 
आले पाहिजेत. लोकशाही ही सर्व समाजघटकांना 
सामावून घेण्याची प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे 
समावेशित लोकशाहीमुळे समाजातील संघर्षही कमी 
होतात. या सर्वदृष्टीने आपल्या देशात कोणते प्रयत्न
झाले ते पाहू.


3) न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयामुळे महिलांचा सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झालेले आहे ?
Ans-1) महिलांना राजकारण मध्येच 50 टक्के जागा उपलब्ध करून दिलेले आहे.
2) त्यांना हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण देणारे कायदे तयार केले आहेत.
3) बालविवाह विरोधी कायदा, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा ,लैंगिक अत्याचारापासून संरक्षण होणारा कायदा ,हुंडा प्रतिबंधक कायदा असे कायदे त्यांना देण्यात आलेले आहेत



                               I hope this article use for you all students please follow me👆                   

Saturday, May 22, 2021

9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन प्रश्न उत्तरे

 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन प्रश्न उत्तरे



 १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण

करा.

(१) लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन 

चित्रकाराने रेखाटलेल्या ........... या चित्राचा 

समावेश लुव्र संग्रहालयात आहे.

(अ) नेपोलियन (ब) मोनालिसा

(क) हॅन्स स्लोअन (ड) दुसरा जॉर्ज

Ans-ब) मोनालिसा

(२) कोलकाता येथील ........... हे भारतातील 

पहिले संग्रहालय होय.

(अ) गव्हर्न्मेंट म्युझियम

(ब) राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय

(क) छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय

(ड) भारतीय संग्रहालय

Ans-(ड) भारतीय संग्रहालय



(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.

(१) महाराज सयाजीराव विद्यापीठ - दिल्ली

(२) बनारस हिंदू विद्यापीठ - वाराणसी

(३) अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी - अलिगढ

(४) जिवाजी विद्यापीठ - ग्वालियर

Ans-(१) महाराज सयाजीराव विद्यापीठ - दिल्ली

महाराज सयाजीराव विद्यापीठ - वडोदरा


२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

(१) अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि

इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात

Ans-1)ग्रंथालये ही ज्ञानाची आणि माहितीची भांडारघरे 

असतात.अभिलेखागारांचे व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या

ग्रंथालय व्यवस्थापनाचेच एक अंग असते.

2) ग्रंथालय ग्रंथाचे संकलन आणि त्याची पद्धतशीर आयोजन जतन आणि संवर्धन हे करत असतात आणि अभिलेखागार  जुने ग्रंथ जपत असतात.

3) म्हणून अभिलेखागार ए व ग्रंथालय नियतकालिका आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात.


२) विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची 

आवश्यकता असते.

Ans-आपल्याला माहीतच आहे की कुठलेही जर प्रशिक्षण करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला विविध अभ्यास आपल्याला हा करावा लागतो तसेच विविध साधण्यासाठी देखील अभ्यास करावा लागतो ते खालीलप्रमाणे  मौखिक साधण्यासाठी वेगळा आहे लिखित साधण्यासाठी वेगळा आहे आणि भौतिक साधननासाठी वेगळा आहे.

1) मौखिक साधने:-उपयुक्त प्रशिक्षण ः (१) समाजशास्त्र

(२) सामाजिक मानवशास्त्र (३) मिथके आणि

भाषाशास्त्र (४) ग्रंथालय व्यवस्थापन (५) इतिहास 

आणि इतिहास संशोधनपद्धती (६) संशोधनपर लेखन.


2)भैतिक साधने:-पुरातत्त्वीय अभ्यासपद्धती, सिद्धान्त आणि

प्राचीन संस्कृती यांचा परिचय.

२. पुरावस्तू बनवण्यासाठी वापरलेल्या दगड, 

खनिजे, धातू, चिकणमाती यांसारख्या माध्यमांचे 

प्रादेशिक स्रोत, त्यांच्या रसायनशास्त्रीय

वैशिष्ट्यांचे ज्ञान.

३. पुरावस्तूंची सफाई आणि इतर रासायनिक 

प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे आणि रसायनांची 

माहिती.

४. विविध कलाशैली आणि त्यांच्या विकासाचा 

क्रम यांचे ज्ञान.

५. पुरावस्तू आणि जीवाश्म यांच्या प्रतिकृती 

बनवण्याचे कौशल्य.


3)लिखित साधने:-१. ब्राह्मी, मोडी, पर्शियन यांसारख्या लिपी आणि

त्यांच्या विकासाच्या क्रमाचे ज्ञान.

२. इतिहासकालीन समाजरचना आणि परंपरा, 

साहित्य आणि संस्कृती, राजसत्ता, 

शासनव्यवस्था इत्यादींचे प्राथमिक ज्ञान.

३. विविध चित्रशैली, शिल्पकलाशैली आणि

त्यांच्या विकासाचा क्रम यांचे ज्ञान.

४. कागदाचे प्रकार, शाई आणि रंग यांचे ज्ञान.

५. कोरीव लेखांसाठी वापरलेला दगड, धातू यांच्या

स्वरूपाविषयीची माहिती.

६. दस्तऐवजांची सफाई आणि संवर्धन यांसाठीच्या

आवश्यक रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी 

उपकरणे आणि रसायने यांची माहिती.

७. संग्रहालयाच्या दालनांमधील प्रदर्शन व्यवस्थापन 

आणि माहिती तंत्रज्ञान.

८. संशोधनपर लेखन.


3टिपा लिहा 

1)स्थल कोश:-

Ans-इतिहासाच्या अभ्यासासाठी 

भूगोल महत्त्वाचा आहे. विविध ऐतिहासिक स्थळांच्या

संदर्भांत माहिती देणारे कोश आहेत.

(१) महानुभाव पंथातील मुनी व्यास यांनी रचलेला 

स्थानपोथी (१४ वे शतक) या ग्रंथात महानुभाव पंथाचे 

प्रवर्तक श्रीचक्रधर स्वामी ज्या-ज्या गावी गेले त्या

गावांची तपशीलवार नोंद आहे. तत्कालीन महाराष्ट्राची

कल्पना या ग्रंथावरून येते. लीळाचरित्रातील विविध 

घटना केव्हा, कोणत्या स्थळी व कोणत्या प्रसंगाने 

घडल्या हेही स्थानपोथीकार सांगतात. त्यामुळे 

श्रीचक्रधरस्वामींच्या चरित्रलेखनासाठी हा उत्तम 

संदर्भग्रंथ आहे.

2)प्राचीन भारतीय स्थलकोश (१९६९) : 

सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी या कोशाची रचना 

केली आहे. वैदिक साहित्य, कौटिलीय अर्थशास्त्र, 

पाणिनीचे व्याकरण, वाल्मीकी-रामायण, महाभारत, 

पुराणे, मध्ययुगीन संस्कृत आणि शब्दकोश साहित्य, 

तसेच फार्सी, जैन, बौद्ध, ग्रीक आणि चिनी साहित्य

यांमधील भौगोलिक स्थळांची माहिती कोशात दिली 

आहे.



2)विश्वकोश :-

Ans-महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री

यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा व साहित्य

यांच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य

संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी विश्वकोश निर्मितीस 

चालना दिली. 

2)तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या

नेतृत्वाखाली विश्वकोश निर्मिती सुरू झाली. 

जगभरातील ज्ञान साररूपाने या कोशांमध्ये आणले 

आहे. 

3)इतिहास विषयाशी निगडित असणाऱ्या

महत्त्वाच्या नोंदी यात आहे.


3)संज्ञा कोश:-

Ans-1) तिहासातील संज्ञा वेगळ्या

काढून त्या समजावून सांगणारे कोश इतिहासात तयार 

करतात. 

2)अभ्यासकांना त्याचा उपयोग होतो. 

इतिहास विषयाच्या अभ्यासकांना कोशरचनेच्या

कामात भरपूर संधी उपलब्ध आहेत. कोणत्याही 

विषयावरचा कोश असो त्याला इतिहासाची जोड देणे

आवश्यक असते.

3)प्रत्येक विषयाला इतिहास असतो. 

इतिहासाचे अभ्यासक कोशांच्या अभ्यासातून घटना 

कोश, दिनविशेष, व्यक्तिकोश, संज्ञाकोश, स्थलकोश 

इत्यादी कोश तयार करण्यात सहभागी होऊ शकतात.

4)या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासानंतर तुमच्या हेही लक्षात आले असेल की इतिहास या विषयात प्रावीण्य

संपादन केले तर अनेक क्षेत्रांमधील व्यवसायाच्या

संधी उपलब्ध होऊ शकतात. या पाठ्यपुस्तकात 

दिलेल्या माहितीचा उपयोग करून तुम्हांला तुमच्या

आवडीप्रमाणे भविष्यातील कार्यक्षेत्र निवडता येईल.

4) सरस्वती महाल ग्रंथालय:-

Ans-1) तमिळनाडूतील तंजावर येथील ‘सरस्वती 

महाल ग्रंथालय’ हे इसवी सनाच्या सोळाव्या-

सतराव्या शतकातील नायक राजांच्या काळात 

बांधले गेले. 

2)इसवी सन १६७५ मध्ये व्यंकोजीराजे 

भोसले यांनी तंजावर जिंकून घेतले आणि

स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन केले. 

3)व्यंकोजीराजे भोसले आणि त्यांच्या वंशंजांनी सरस्वती महाल ग्रंथालय अधिकाधिक समृद्ध केले. त्यांमध्येसरफोजीराजे भोसले यांचा महत्त्वाचा वाटा होता. 

3)त्यांच्या सन्मानार्थ इसवी सन १९१८ मध्येया ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले. या ग्रंथालयाच्या संग्रहात सुमारे एकोणपन्नास हजार ग्रंथ आहेत.



4)४. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

(१) ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे?

Ans-1) ग्रंथालये ही ज्ञानाची आणि माहितीची भांडारघरे 

असतात. ग्रंथालयशास्त्राचा व्यवस्थापनशास्त्र, माहिती 

तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र यांसारख्या विषयांशी निकटचा 

संबंध आहे.

2) ग्रंथांचे संकलन, त्यांचे पद्धतशीर 

आयोजन, जतन आणि संवर्धन, माहितीच्या स्रोतांचे 

प्रसारण अशी महत्त्वाची कामे ग्रंथालयांमार्फत पार 

पाडली जातात.

3)यातील बहुतेक कामे अद्ययावत संगणकीय प्रणालीच्या आधारे केली जातात. 

वाचकांना आवश्यकतेनुसार हवे तेव्हा नेमके ग्रंथ 

उपलब्ध करून देणे, या गोष्टीला ग्रंथालय

व्यवस्थापनात अत्यंत महत्त्व आहे.


(२) अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे 

महत्त्वाची आहेत?

Ans-1) अभिलेखागारांचे व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या

ग्रंथालय व्यवस्थापनाचेच एक अंग असते. महत्त्वाच्या

नोंदी असलेली कागदपत्रे त्यांमध्ये कोणताही बदल 

न करता सुरक्षित ठेवणे, त्यांच्या सूची तयार करणे 

आणि ती हवी तेव्हा उपलब्ध करून देणे ही कामे अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात महत्त्वाची असतात.

2)त्यामुळे ही कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत 

विश्वासार्ह मानली जातात. संगणकीय प्रणालींच्या

उपयोगामुळे ग्रंथालय आणि अभिलेखागार यांचे 

आधुनिक काळातील व्यवस्थापन अपरिहार्यपणे 

माहिती तंत्रज्ञानाशी जोडले गेले आहे.



5) पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा.



Ans-1) शब्दकोश

2) विश्वकोश

3) सूची वाड्मय

4)कोशसदृश्य वाडमय

I hope this article  is useful 

Please follow me 








Biomolecules class 11th mind map

 Biomolecules class 11th mind map